उठल्या लहरी काही

उठल्या लहरी काही, गेले धुवून सारे उरल्या खुणा, कधी न पुसण्याजोग्या स्वच्छ निर्मळ, पाण्यासारखा नागवा आणि व्याख्या, दृष्ट न लागण्याजोग्या त्वचेला झाकले हसून, तरी दिसतात खोल जखमा, कधी न झाकण्याजोग्या विसरलो सारे, क्षण, वाटा आणि वळणे प्रत्येक त्या जागा, निवांत बसण्याजोग्या आता विस्तीर्ण मोकळे, आभाळ एकटे हरवल्या उमेदी, पंखांत भरण्याजोग्या उरे आभासी जगातले, आभासी जगणे…

त्यासी भीती गा कशाची

पांडुरंग हो पाठीराखा रखुमाई माय जयाची त्यासी भीती गा कशाची त्यासी भीती गा कशाची आम्हा ना ठावे गाव कूळ ना हो विषयाची जाण सत्य वाणी हो जयाची त्यासी भीती गा कशाची वस्त्रात होई नागवा त्याने द्यावे हो लांछन जो धरे कास धर्माची त्यासी भीती गा कशाची जाळोनि का सुवर्णे जाते तेज हो जळून अणुरेणू साक्ष…

आई

जेव्हा कधी मी अशा आईला बघतो की तिची ईच्छा असूनही तिचं बाळ पुढे जाऊ शकत नाही. त्या आईला काय वाटत असेल? कित्येकदा मी हेही पाहिलंय की मुलगा किंवा मुलगी दिव्यांग असते, त्यांना चालत येत नसतं, बोलता येत नसतं, विचार करता येत नसतो आणि आपल्याला काय वाटतंय ते सुद्धा सांगता येत नसतं, तरीही ती म्हातारी आई…

सारे चिराग

सारे चिराग ए मुहब्बत जलाए रखिये उनका इस गलीसे गुजरने का वक़्त है ख़्वाबोँसे पलकोंका परदा उठाए रखिये उनका इन आँखोंमे बसरने का वक़्त है हवा महसूस करे है उसे ना दबाए रखिये उनका इन झोकोंमे महकने का वक़्त है हमराह है वो मेरा माहौल बनाए रखिये उनका इन साँसोंमे उतरने का वक़्त है अबके…

हे जननी जन्मभूमी

तू अभंग कारुण्यमूर्ती तू रवी दिव्यसम स्फूर्ती तू पतित पावन गंगा सागराची अमर्त्य उर्मी हे जननी जन्मभूमी सुफला वरदा तू धरिणी तृणसमान स्वर्ग या चरणी विश्वमुकुटी तू राजमणी तव गाऊ कशी आरती मी हे जननी जन्मभूमी हे माते मंगलदायिनी देवी शौर्यरत्न धारिणी कर जोडून तुज वंदितो मनमंदिराच्या धामी हे जननी जन्मभूमी तव नाम जणूकी स्तोत्र…

पांढरे फूल

संगमाच्या नशिबी होत्या देवळांच्या अनंत राशी अश्रूत दिसे कोणाला गंगा वाळूत दिसते काशी घरटेही अमर कोणाचे त्याचाही वैरी वारा ते गळले तरी निरंतर चिमणीही शोधते चारा पापण्यांवर तुझ्या कधीचा तो दाटून आहे जलधी तू भिजवून टाक स्वतःला ऋतू बदलण्या आधी एकेक अक्षरासाठी वेड्या रडशील किती असाच प्रत्येक नव्या पानाला फांदीचा असतो जाच स्वप्नातल्या बांध खांबांना…

बेमुदत !

तुम्ही आणि मी बोलून काय होणार ? जोरजोरात रडण्यावर कोणाचीही बंदी नाही म्हणून तेवढंच करता येतंय … बेमुदत ! कुणाकुणाच्या नाड्या कुठे अडकल्यात ? तुमच्या आणि माझ्या नरड्या आवळल्यात म्हणून मरता मरता जगता येतंय … बेमुदत ! ज्याला त्याला स्वातंत्र्य आहे नव्हे हक्क आहे संप करण्याचा, तोही … बेमुदत ! तुम्हाला आणि मला काही करता…

तपस्वी

नशीब … नशीब ही अशीच एक विनोदी गोष्ट .. ज्या ज्या गोष्टींना आपल्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार मिळालेला आहे त्यांच्या पैकी एक ! नशीब कुबेराला एका क्षणात भिकारी, एका भिकाऱ्याला धनी एव्हढंच काय पण एका अनोळखी माणसाला महात्मा बनवू शकतं. लोकांचे समज हा माणसाला काही अंशी उपयोगी पडणारी गोष्ट जरी असली तरी काही जणांना ते पटत…

एका नोकरदाराचे मनोगत ..

एव्हढं महात्म्यांपर्यंत जायची गरज नाहीये… सामान्य नोकरदाराचही आयुष्य नशिबावर काही कमी अवलंबून नसतं. पण नोकरदार माणसाला पळवाट नसते त्याला त्याच्यामधुनच जावं लागतं , त्यातून सुटका नाही. कधी कधी तो बोलू लागला की आश्चर्य वाटतं , फाईल बरबटवणाऱ्या आणि जोडे झिजवणाऱ्या माणसाला काय वाटतं आणि विशेष म्हणजे तो आजूबाजूच्या गोष्टींबद्दल बारीक सारीक निरीक्षणं करून ठेवतो ..…

दिशा

रात्रीने चालवलेल्या या खेळामुळे मात्र आता संध्याकाळ होऊ लागली की मला थोडं दडपण येतं. संध्याकाळी वाटतं की सगळ्यापासून लांब लांब जावं, सगळे संपर्क तोडावेत काही बोलू नये फक्त चालत राहावं. वाट मिळेल तिथे जावं पण अशा वेळीही जायचं कुठे ? .. ही वाट जाणार कुठे ? असे प्रश्न पडतातच. रोजची माझी ही वाटहीन मुशाफिरी बघितली…